निर्मळ प्रेमाचा सागर ‘येशू ख्रिस्त’
येशु ख्रिस्त म्हणजे जगाला मिळालेली ‘मैत्री’ची एक देणच आहे. त्यांच्याइतकी अपार मैत्री कोणाकडे असेल, असे बहुदा वाटत नाही. शेवटच्या क्षणपर्यंतही ते बहुजनांच्या हितासाठी, बहुजणांच्या सुखासाठी मंगलमैत्री करत होते. ज्यांनी त्यांना सुळावर चढवले, अशा निर्दयी लोकांचेही भले व्हावे, त्यांना त्यांची चुक समजावी, यासाठी प्रार्थना करत होते. पण ज्यांच्यावर ‘एव्हिल’ आरुढ झालेला असतो, जो अकुशल कर्मांमध्ये इतका बुडाला असतो, की त्याला चांगल्या-वाईटाची जाणीवच उरत नाही. पण जे सदपुरुष आहेत, ते मात्र आपल्या दृढ निश्चयापासून कधीच स्वतःला दुर करत नाहीत. हेच येशुंनी केले.
येशु ख्रिस्तांचा आज जन्मदिवस. बॅथेलेहेम या शहरात त्यांचा जन्म झाला; आणि पृथ्वीतलावर जणू देवच अवतरला. म्हणतात ना, अंधारानंतर सुर्योदय होणे हे क्रमप्राप्तच असते. तसेच काहीसे येशुंबाबत झाले. त्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा रोमन साम्राज्य बहारलेले होते. ऑगस्टस हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. तो आपल्या क्रुरतेसाठी प्रसिध्द होता. येशूंच्या जन्मावेळी त्याने रोमन साम्राज्याची जनजगणा करण्याचे ठरवले होते आणि सर्वांना बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदविण्याचे फर्मान सोडले होते. त्याच वेळी येशुंची आई मेरी गर्भवती होती. त्या आपल्या पतीसह बॅथेहेहमला आल्या होत्या; पण त्यांना निवार्यासाठी जागा मिळाली नाही आणि उघड्यावरच येशुंचा जन्म झाला. बहुदा एखाद्या महापुरुषाने उघड्यावर जन्म घेण्याची ही दुसरी वेळ होती. येशुंच्या पूर्वी गौतम बुध्दांचाही असाच नेपाळमधील लुंबनी वनात बुध्दांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे एका गोठ्याशेजारी मेरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तसा येशूूंचा जन्म अशा ठिकाणी होईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र रोमचा सम्राट ऑगस्टसने काढलेल्या फतव्यामुळे हे घडले. येशूंच्या जन्माप्रसंगी ऑगस्टसने आपल्या साम्राज्यातील नागरिकांची गणना करण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार सर्वांवर बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे मेरीही आपल्या पतीसह बॅथेलेहेमला आली होती आणि एका गोठ्याशेजारी येशुंचा जन्म झाला. ‘मैत्रीच्या सागरा’ला जन्म देणारी स्त्री कोणी साधारण नसेल, नक्कीच चारित्र्यसंपन्न असावी, पण समाजात मेरीबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. बहुदा ते निर्माण केलेही असावेत. काही म्हणतात, त्यांचा विवाह झाला नव्हता, तर त्या कुमारी माता होत्या. तर काही ग्रथांमध्ये मेरीच्या पतीचाही उल्लेख आलेला आहे. येशुंच्या जन्माला आता २ हजार १५ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मेरी नक्की विवाहित होत्या; की कुमारी माता होत्या? हा संशोेधनाचा जरी विषय असला, तरी त्याचे १०० टक्के बरोबर उत्तर मिळणे आता शक्य नाही. असे म्हणतात की, मुलांमध्ये आईवडीलांचे गुण येतात. आजकाल डॉक्टरही महिलांना गर्भवती अवस्थेत आनंदी राहण्याचे सल्ले देतात. जेणेकरुन त्यांची होणारी संतान ही सदृढ आणि निर्मळ मनाची निघावी, हा त्यामागचा हेतू असतो. जर हाच नियम येथे लागू केला, तर येशुंच्या आई किती चारित्र्यसंपन्न असतील, याचा आपण विचारही करु शकत नाही. कारण त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला आहे, ज्याच्या अनुयायांची संख्या आज कोटींच्या घरात आहे.
येशुंच्या बाल्यावस्थेबाबत जास्त काही माहिती इतिहासात उपलब्ध नाही, एक मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख होती. पण हा असा मेंढपाळ निघाला की, त्याने सर्वांना मैत्री करायला शिकवले, प्रेम द्यायला शिकवले आणि स्त्रीयांनाही सन्मानाने वागणूक द्या, याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख येथे करावासा वाटतो. एकेवेळी गावातील सर्व मंडळी एका स्त्रीला बांधून दगडाने मारत होते. ग्रामस्थांच्या या कृत्याबाबत येशुंनी सर्वांना विचारले असता ग्रामस्थांनी, ‘ही स्त्री चरित्र्यहिन आहे, पापी आहे’, असे उत्तर दिले. आता येथे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर का ती स्त्री खरोखरच चरित्र्यहिन असावी, तर मग काय तिच्यासोबत ज्या पुरुषांचे संबंध आले, ते धुतल्या तांदळासारखे होते का? मग फक्त स्त्रीयांनाच हा दोष का? असा प्रश्न पडतो आणि कदाचित हीच भावना येशूंच्या मनाला शिवली असावी. त्यांनीही वेळ न दवडता, ‘जो कोणी पाणी नसेल, ज्यांने कधीही आयुष्यात कोणतीही वाईट कृत्य केले नसेल, त्यांनीच या स्त्रीला दंड द्यावा’, येशूंच्या या वाक्याने लगेचच सर्वांच्याच हातातून दगडे खाली पडलीत. कोणाचेही दोष दाखवताना आपण निर्दोष आहोत का? याचे स्वतः आत्मपरिक्षण करण्याचा धडाच त्यांनी सर्वांना शिकवला. त्यांचा हा धडा आजही जसाच्या तसा लागु पडतो. कारण आजही प्रत्येकजण स्वतःमधील दोष दुर करण्यापेक्षा दुसर्यांच्या चुका शोधण्यात धन्यता मानतात. ख्रिचन बांधवांमध्ये वाईन आणि ब्रेडला अनन्यसाधारण महत्व आहे. येशुंनी शेवटचे जेवण म्हणून वाईन आणि ब्रेड ग्रहण केले होते, अशी धारणा आहे. त्यामुळे कोणत्याही मंगलप्रसंगी ख्रिचन बांधव वाईन आणि ब्रेडचा आस्वाद जरुर घेतात. जेणेकरुन त्यांचे गुण आमच्यातही उतरलीत. त्यांची दया-मैत्रीची क्षमता आम्हालाही प्राप्त होईल, हा त्यामागचा सुप्त हेतू असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार पसरविण्याचे काम ‘त्या’ ४० अनुयायांनी केले. पण आज खरंच येशुंचा अनुयायी त्यांचे विचार अंगीकृत करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि यंदाच्या ख्रिसमसला येशु ख्रिस्तांमधील असलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा या भावाना आपल्याही अंगी उतराव्यात, याचा संकल्प करावा, म्हणजे खर्या अर्थाने मेरी ख्रिसमस साजरा होईल.
येशु ख्रिस्त म्हणजे जगाला मिळालेली ‘मैत्री’ची एक देणच आहे. त्यांच्याइतकी अपार मैत्री कोणाकडे असेल, असे बहुदा वाटत नाही. शेवटच्या क्षणपर्यंतही ते बहुजनांच्या हितासाठी, बहुजणांच्या सुखासाठी मंगलमैत्री करत होते. ज्यांनी त्यांना सुळावर चढवले, अशा निर्दयी लोकांचेही भले व्हावे, त्यांना त्यांची चुक समजावी, यासाठी प्रार्थना करत होते. पण ज्यांच्यावर ‘एव्हिल’ आरुढ झालेला असतो, जो अकुशल कर्मांमध्ये इतका बुडाला असतो, की त्याला चांगल्या-वाईटाची जाणीवच उरत नाही. पण जे सदपुरुष आहेत, ते मात्र आपल्या दृढ निश्चयापासून कधीच स्वतःला दुर करत नाहीत. हेच येशुंनी केले.
येशु ख्रिस्तांचा आज जन्मदिवस. बॅथेलेहेम या शहरात त्यांचा जन्म झाला; आणि पृथ्वीतलावर जणू देवच अवतरला. म्हणतात ना, अंधारानंतर सुर्योदय होणे हे क्रमप्राप्तच असते. तसेच काहीसे येशुंबाबत झाले. त्यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा रोमन साम्राज्य बहारलेले होते. ऑगस्टस हा रोम साम्राज्याचा सम्राट होता. तो आपल्या क्रुरतेसाठी प्रसिध्द होता. येशूंच्या जन्मावेळी त्याने रोमन साम्राज्याची जनजगणा करण्याचे ठरवले होते आणि सर्वांना बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदविण्याचे फर्मान सोडले होते. त्याच वेळी येशुंची आई मेरी गर्भवती होती. त्या आपल्या पतीसह बॅथेहेहमला आल्या होत्या; पण त्यांना निवार्यासाठी जागा मिळाली नाही आणि उघड्यावरच येशुंचा जन्म झाला. बहुदा एखाद्या महापुरुषाने उघड्यावर जन्म घेण्याची ही दुसरी वेळ होती. येशुंच्या पूर्वी गौतम बुध्दांचाही असाच नेपाळमधील लुंबनी वनात बुध्दांचा जन्म झाला होता. त्याचप्रमाणे एका गोठ्याशेजारी मेरीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. तसा येशूूंचा जन्म अशा ठिकाणी होईल, हे अपेक्षित नव्हते. मात्र रोमचा सम्राट ऑगस्टसने काढलेल्या फतव्यामुळे हे घडले. येशूंच्या जन्माप्रसंगी ऑगस्टसने आपल्या साम्राज्यातील नागरिकांची गणना करण्याचा आदेश पारित केला होता. त्यानुसार सर्वांवर बॅथेलेहेमला येऊन नाव नोंदणी करणे बंधनकारक होते. त्यामुळे मेरीही आपल्या पतीसह बॅथेलेहेमला आली होती आणि एका गोठ्याशेजारी येशुंचा जन्म झाला. ‘मैत्रीच्या सागरा’ला जन्म देणारी स्त्री कोणी साधारण नसेल, नक्कीच चारित्र्यसंपन्न असावी, पण समाजात मेरीबाबत अनेक समज-गैरसमज निर्माण झाले आहेत. बहुदा ते निर्माण केलेही असावेत. काही म्हणतात, त्यांचा विवाह झाला नव्हता, तर त्या कुमारी माता होत्या. तर काही ग्रथांमध्ये मेरीच्या पतीचाही उल्लेख आलेला आहे. येशुंच्या जन्माला आता २ हजार १५ वर्षे झाली आहेत, त्यामुळे मेरी नक्की विवाहित होत्या; की कुमारी माता होत्या? हा संशोेधनाचा जरी विषय असला, तरी त्याचे १०० टक्के बरोबर उत्तर मिळणे आता शक्य नाही. असे म्हणतात की, मुलांमध्ये आईवडीलांचे गुण येतात. आजकाल डॉक्टरही महिलांना गर्भवती अवस्थेत आनंदी राहण्याचे सल्ले देतात. जेणेकरुन त्यांची होणारी संतान ही सदृढ आणि निर्मळ मनाची निघावी, हा त्यामागचा हेतू असतो. जर हाच नियम येथे लागू केला, तर येशुंच्या आई किती चारित्र्यसंपन्न असतील, याचा आपण विचारही करु शकत नाही. कारण त्यांनी एका अशा पुत्राला जन्म दिला आहे, ज्याच्या अनुयायांची संख्या आज कोटींच्या घरात आहे.
येशुंच्या बाल्यावस्थेबाबत जास्त काही माहिती इतिहासात उपलब्ध नाही, एक मेंढपाळ म्हणून त्यांची ओळख होती. पण हा असा मेंढपाळ निघाला की, त्याने सर्वांना मैत्री करायला शिकवले, प्रेम द्यायला शिकवले आणि स्त्रीयांनाही सन्मानाने वागणूक द्या, याची शिकवण दिली. त्यांच्या जीवनातील एका प्रसंगाचा उल्लेख येथे करावासा वाटतो. एकेवेळी गावातील सर्व मंडळी एका स्त्रीला बांधून दगडाने मारत होते. ग्रामस्थांच्या या कृत्याबाबत येशुंनी सर्वांना विचारले असता ग्रामस्थांनी, ‘ही स्त्री चरित्र्यहिन आहे, पापी आहे’, असे उत्तर दिले. आता येथे एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर का ती स्त्री खरोखरच चरित्र्यहिन असावी, तर मग काय तिच्यासोबत ज्या पुरुषांचे संबंध आले, ते धुतल्या तांदळासारखे होते का? मग फक्त स्त्रीयांनाच हा दोष का? असा प्रश्न पडतो आणि कदाचित हीच भावना येशूंच्या मनाला शिवली असावी. त्यांनीही वेळ न दवडता, ‘जो कोणी पाणी नसेल, ज्यांने कधीही आयुष्यात कोणतीही वाईट कृत्य केले नसेल, त्यांनीच या स्त्रीला दंड द्यावा’, येशूंच्या या वाक्याने लगेचच सर्वांच्याच हातातून दगडे खाली पडलीत. कोणाचेही दोष दाखवताना आपण निर्दोष आहोत का? याचे स्वतः आत्मपरिक्षण करण्याचा धडाच त्यांनी सर्वांना शिकवला. त्यांचा हा धडा आजही जसाच्या तसा लागु पडतो. कारण आजही प्रत्येकजण स्वतःमधील दोष दुर करण्यापेक्षा दुसर्यांच्या चुका शोधण्यात धन्यता मानतात. ख्रिचन बांधवांमध्ये वाईन आणि ब्रेडला अनन्यसाधारण महत्व आहे. येशुंनी शेवटचे जेवण म्हणून वाईन आणि ब्रेड ग्रहण केले होते, अशी धारणा आहे. त्यामुळे कोणत्याही मंगलप्रसंगी ख्रिचन बांधव वाईन आणि ब्रेडचा आस्वाद जरुर घेतात. जेणेकरुन त्यांचे गुण आमच्यातही उतरलीत. त्यांची दया-मैत्रीची क्षमता आम्हालाही प्राप्त होईल, हा त्यामागचा सुप्त हेतू असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार पसरविण्याचे काम ‘त्या’ ४० अनुयायांनी केले. पण आज खरंच येशुंचा अनुयायी त्यांचे विचार अंगीकृत करतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा आणि यंदाच्या ख्रिसमसला येशु ख्रिस्तांमधील असलेली मैत्री, करुणा, मुदीता आणि उपेक्षा या भावाना आपल्याही अंगी उतराव्यात, याचा संकल्प करावा, म्हणजे खर्या अर्थाने मेरी ख्रिसमस साजरा होईल.