Monday 27 February 2017

मराठी भाषेची स्थित्यंतरे

उपेक्षित हा शब्द भारतीयांसाठी काही नवीन नाही. गेल्या कित्येक पिढ्यांनी या देशात उपेक्षा सहन केली आहे. पंरतु, स्वातंत्र्यानंतरही येथे साहित्यिकांनाही उपेक्षाची भावना सहन करावी लागते, हे या संपन्न भारताचे दुर्दैवच म्हणावे लागेल. साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. पण तरीही येथे एक असा घटक आहे, ज्यांना या संमेलनात दुय्यम स्थान मिळते. म्हणून त्यांनी स्वत:चे व्यासपीठ उभे करण्याचे ठरविले आहे. त्यांची ही धडपड गेल्या २५ वर्षांपासून सुरु आहे. उर्दूचा पगडा असलेल्या मुस्लिम समाजातही मराठी साहित्यिक निर्माण होऊ पाहत आहेत. त्यांना व्यासपीठ देण्यासाठी मुस्लिम मराठी साहित्य मंडळ प्रयत्नशील आहे.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांची मुलाखत घेतली. येत्या मे महिन्यात १९, २० आणि २१ रोजी अकरावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये संपन्न होणार आहे. शासनाकडून निधी मिळत नसल्यामुळे या साहित्य संमेलनाला वलय प्राप्त नसले तरी मुस्लिम समाजासह उपेक्षित साहित्यिकांसाठी हे हक्काचे व्यासपीठ निर्माण झाले आहे. यानिमित्ताने डॉ. शेख यांनी मराठी भाषेच्या स्थित्यांतराची सविस्तर माहिती दिली. मराठी भाषेला कोणत्याही एका चौकटीत बसवता येणार नाही. ही कालांतराने विकसित झालेली भ्ााषा आहे आणि  भाषेवर इतर भाषांचा मोठा पगडा पडला आहे. जशी उर्दू विकसित झाली, तशी मराठीही विकास पावत गेलेली भाषा आहे. उर्दु ही लष्कारी भाषा म्हणून ओळखली जायची. अल्लउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर उर्दू भाषेचा जन्म झाला. खिल्जीच्या सैन्यात कर्नाटक, आध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि हैदराबाद येथील सैनिकांचा मोठ्या प्रमाणावर भरणा होता. प्रत्येक राज्याची बोलीभाषा वेगळी असल्यामुळे या सर्वांच्या बोलीभाषेतून एकरुप होत उर्दुचा विकास पावला. मराठी भाषाही तशीच विकसित पावली. मराठी भाषेवर पाली आणि संस्कृत भाषेचा मोठा पगडा दिसून येतो. मराठीतील बहुतांशी शब्द पालीमधून आले आहेत. हे प्रत्येक भाषेसोबत घडते. इंग्रजीने मराठीचा शब्द ‘लूट’ जशाचा तसा घेतला आहे. तसेच ‘दवाखाना’ हा पारशी शब्द मराठीत आज रुळला आहे. ‘दरवाजा’ हा मूळ शब्द उर्दूतून आला आहे. आज इंग्रजीचा शब्द ‘टेबल’ला मराठीत काय पर्याय आहे? काहीच नाही. ‘मात्र’ हा शब्द हिंदी आिण मराठी या दोन्ही भाषांमध्ये आढळतो. विशेष म्हणजे दोन्ही भाषांमध्ये त्याचा अर्थ हा एकच आहे. ‘पाली’ भाषेतला ‘राग’ आणि मराठीतील ‘राग’ हा थोड्याफार अंतरात भिन्न्ा जाणवतो. ‘पाली’तील ‘रागा’चा अर्थ आसक्ती तर मराठीतील ‘रागा’चा अर्थ क्रोध आिण हा ‘क्रोध’ मुळचा संस्कृत शब्द आहे. तर ‘क्रोधा’ला ‘पाली’त ‘कोधं’ म्हटले जाते. ही आहे भाषेची गंमत! गुजराती भाषा आिण मराठी भाषा जेमतेस सारखीच भासते. बहतांशी गुजराती भाषेतील शब्द हे मराठी आहेत. भाषा ही अशा प्रकारचे विकास पावते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात मराठी भाषेचा लहजा वेगळा होता. संत ज्ञानेश्वरांच्या काळी मराठी वेगळी होती. संत ज्ञानेश्वरांच्या काळातील तत्कालीन मराठी आता संस्कृतप्रमाणे भासते. परंतु, ती संस्कृत नाही. शिवाजी महाराजांच्या मराठीवर पारसी आणि उर्दुचा पगडा होता. ‘फितुर’ हा मूळ मराठी शब्द नाही, परंतु, शिवाजी महाराजांच्या बखरींमध्ये हा सर्रास आढळला जाणार शब्द आहे. पेशवेकालीन मराठीही तशीच थोडी बदललेली जाणवते. त्यानंतर महात्मा ज्योतीराव फुले यांच्या कालखंडातील अर्थात अठराशेच्या शतकात मराठीतील बोलीभाष्ाा आणि आज बोलली जाणारी ‘मराठी’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसतो. महात्मा फुलेंच्या साहित्यावरुन त्याची प्रचिती येते. महात्मा फुलेंच्या ‘शेतकऱ्यांचा आसुड’ या ग्रंथात ‘आमिष’ ऐवजी ‘मिष’ असा शब्दप्रयोग काही ठिकाणी सापडतो. येथे ‘आ’ हे अक्षर सायलेंट आहे. लिखाणामध्ये म्हणायचे झाले तर अगदी अलीकडे काही शब्द बदलले आहेत. उदाहरणार्थ ‘ह्या’ ची जागा ‘या’ ने घेतली तर ‘यांचे’चे ‘यांच्या’ असा वापर होऊ लागला आहे. अशा प्रकारे मराठी ही विकासित होणारी भाषा आहे. तिला कोणत्याही बंधनात बांधता येत नाही. आपल्याकडे प्रत्येक बारा किलोमीटर अंतरावर मराठी भाषेत फरक जाणवतो. अनेकवळा भाषेवर गावंढळ, शुद्ध असे लेबल लावले जातात. परंतु, डॉ. शेख यांना हे लेबल अमान्य आहेत. विशिष्ट प्रकारे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे, ही जी खुळचट संकल्पना रुजली आहे, ती मुळातच अत्यंत हस्यास्पद आहे. प्रमाण-अप्रमाण असे काहीच नसते. भाषा ही संवाद साधण्याचे माध्यम आहे. निजामशाहीच्या प्रभावाखाली असल्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात मराठी भाषेत अनेक उर्दु, हिंदी आिण पारसी शब्द आज दुधात साखरेप्रमाणे मिसळले आहेत. मराठवाड्यात भाड्याच्या घराला सरार्ससपणे ‘किरायाचे घर’ म्हटले जाते.   पश्िचम महाराष्ट्रातील लोकांचा मराठी बोलण्याचा लेहजा वेगळा आहे.  साताऱ्यातील मुस्लिम बांधव मराठी बोलताना अर्ध हिंदीचा सर्रास वापर करतात. त्यामुळे ते चूकीचे मराठी बोलत आहेत, असे म्हणण्यापेक्षा ते ‘खडी बोली’त मराठी बोलत आहे, हे म्हणणे अधिक योग्य ठरेल. व्यक्त होण्यासाठी असलेले माध्यम ‘मराठी’ एवढेच काय ते मानावे. प्रमाण-अप्रमाण, शुद्ध-गांवढळ बाेलून समृद्ध भाषेचा अपमान करु नये.            

Tuesday 14 February 2017

This Valentine Say....‘लिव्ह ईन’च्या बाधेपासून आम्ही दूरच

पूर्वी विद्यार्थ्यांची ओळख त्यांच्या गुणांवरुन व्हायची. खेळ, कला आणि शिक्षणामध्ये अव्वल असलेला कॉलेजचा हिरो असायचा. मात्र अलीकडच्या काळात ही परिभाषा बदलत गेली. हल्ली मुलींना फिरवणाऱ्याची कॉलेजमध्ये चलती असते. किंबहुना जो मुलींमध्ये जास्त परिचयाचा असतो, तोच त्या ग्रुपचा अॅडमीन असतो. येथे ग्रुप म्हणजे व्हॉट्सअॅप नव्हे बरं का! मित्रांच्या खऱ्याखुऱ्या ग्रुपचा तो म्होरक्या असतो. मुलींना पटविण्यासाठी त्याचा मार्गदर्शक सल्ला मोलाचा ठरतो. कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत ‘टाईमपास’ असलेली ‘ती’ जीवनसोबती कधी बनते, हे त्याचेच त्याला कळत नाही. पण अलीकडे रिलेशनशिप लाँग टाईम ठेवण्याचा ट्रेण्डच गायब होताना दिसत आहे. करण जोहरच्या चित्रपटांचा हा परिणाम आहे, असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही.
अलीकडे प्रेमपटातून निराळेच ‘संबंध’ दाखविण्यात येत आहेत. किंबहूना आजच्या तरुण पिढीचे ते प्रतिबिंबच म्हणावे लागेल. पबमधील डान्स फ्लोअरवर मैत्री होते आणि त्याच रात्री प्रेमाचा ‘अंकूर’ही फुलतो. शहरात मुख्यत्व मेट्रो सिटीमध्ये मुलांमुलींमधील मित्रत्वाचे नाते प्रेमात रुपांतरीत होते, हे काही नवीन नाही. आता तर थेट ‘आय लव्ह यू’ पासून सुरुवात होते. प्रेमाच्या बाबतीत ग्रामीण भागानेही कात टाकली आहे. एकेकाळी ग्रामीण भागात फ्रेन्डशिप देते का? या प्रश्नावरुन प्रेमप्रकरणे फुलत होती. परंतु, येथीलही लाईफ फास्ट झाली आहे. नव्या दमाच्या दिग्दर्शकांच्या प्रेमपटांमुळे प्रभावित झालेला प्रत्येक तरुण ‘तिला’ कशी बाटलीत उतरवता येईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो. यासाठी ‘त्याच्या’ पेक्षा त्याच्या मित्रांचाच जास्त वाटा असतो. तू हो बोलली नाहीस तर हा वैफल्यग्रस्त होईल... वगैरे, वगैरे. जसा शेतीचा हंगाम असतो, प्राण्यांचा प्रजनन काळ असतो, तसा या तरुणांचाही फेब्रुवारी महिना रोमान्सचा पिरियड असतो. ‘रोझ डे’पासून रोमान्सचा लेक्चर सुरु होतो आणि व्हेलेन्टाईन डे दिवशी समारोप. ‘व्हेलेन्टाईन डे’नंतर ती सध्या काय करते? अशी म्हणायची वेळ येऊ नये, यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. परंतु, खरी गंमत ‘प्रपोझ डे’ला उडते. काल गुलाबाचे फुल देऊन सिग्नल तर दिला खरा, पण आज प्रेमाच्या गाडीचा एक्सलेटर रेटायचा कसा? या विवंचनेतच कॉलेजची पायरी चढायची आणि हिंमत करुन एकद्याचे बोलून टाकायचे. बहुतांशी मुलगीही होच म्हणते आणि तिचा नकार असेल तरी तो होच आहे, ही आमच्या तरुण पिढीची श्रद्धा असल्यामुळे तिच्या नकारामुळे फारसा फरकही पडत नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ उक्तीप्रमाणे चिकाटी सोडायची नाही. आज नाही उद्या हो म्हणणारच; नाहीतर जाणार कोणाकडे? अशी प्रत्येक तरुणाची भावना असते. ‘तिच्या’ हो म्हणण्याच्या आशेवर तिसऱ्या दिवशी चॉकलेट देऊन पुन्हा तिला गटविण्याचा प्रयत्न सुरु हाेतो. तसे प्रत्येकाची वेगवेगळी ‘आयटम’ ठरलेली असते, त्यामुळे कोणीही एकमेकांच्यामध्ये लुडबुड करत नाही. फार फार तर मैति्रणी काय त्या मदत करतात, एवढेचं. पण मैत्रिणींची मदतच मोलाची ठरते. कारण हे मित्र साले स्वत:ची पोळी तळण्यासाठी टपलेलेच असतात आणि दुसरे म्हणजे एक मुलगी शिफारस करत असल्यामुळे ‘तिचे’ मन पलटण्यासाठी ते फार उपयोगी ठरते. ‘लोहा गरम’ झाल्यानंतर चौथ्या-पाचव्या दिवशी थोडासा खर्च करायचा आणि व्हेलंटाईन डे मग आपलाच की राव! या ‘कष्टा’ची जाणीव कदाचित गर्भ श्रीमंतांच्या मुलांना नसावी. त्यांचं काय, पार्टीमध्ये एखादी भेटली की ड्रिंक घेता घेता ‘सेट’ होते. दुसऱ्या दिवशी ‘तिची’ही उतरते आणि ‘त्याची’ही. काही वेळ त्यांचे हे रिलेशन खुप काळ चालते. प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते. मध्य असतो आणि शेवटही असतो. कोणतेही नातेसंबंध टिकविण्यासाठी या तीन पायऱ्या चढाव्याच लागतात. कॉलेजमध्ये हसण्या-खेळण्याच्या वयात झालेले प्रेम फुलत जाते. एलआयसीचे हप्ते भरल्यानंतर जशी पॉलिसी मॅच्युर होते, तसे प्रेमही प्रगल्भ होत जाते. शेवटचे वर्ष येईपर्यंत दोघांमध्येही सुसंवाद वाढलेला असतो. करिअरनंतर लग्नाच्या गोष्ठी ठरलेल्या असतात. त्यांनतर फॅमिली प्लॅनिंग आिण पुढील आयुष्य. असा या व्हेलंटाईनचा शेवट होतो़  निदान मध्यमवर्गीयांमध्येही हिच प्रथा सुरु आहे. कर्मधर्मसंयोगाने ‘लिव्ह ईन’ची बाधा सध्याच्या मध्यमवर्गीय तरुणांना झालेली नाही, हे पाहून नक्कीच आनंद होतो.