Wednesday 18 March 2020

लिपींचे उगमस्थान ‘ब्राम्ही’

भारतात प्रत्येक राज्यांची आपली एक विशेष भाषाशैली आहे आणि त्या भाषेला स्वत:चा एक समृद्ध इतिहास आहेमैलागणिक या भाषांच्या देहबोलीत बदल आढळतोमुंबईत बोलणारी हिंदी आणि बिहारमधील हिंदी दोघांमध्ये बरीच तफावत आहेसाम्य केवळ ‘देवनागरी’. हिंदीगुजरातीमराठीभोजपूरी इत्यादी भाषा उच्चारताना वेगवेगळ्या भासत असल्या तरी त्यांची लिपी मात्र एकच आहेती म्हणजे ‘देवनागरी’.  देवनागरी उत्तर भारतात वापरली जातेतर द्रविडीनय लिपीचा दक्षिण भारतात वापर होतोभारतात आज अनेक वैविध्यपूर्ण लिपी आहेत आणि या लिपींचा इतिहासही तितकाच रोचक आहे.
भारताला प्रचीन इतिहास लाभलेला आहेयेथे एकेकाळी ६४ लिपी अस्तित्वात होत्याअसा उल्लेख ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात सापडतोअसे असले तरी उत्खननात केवळ दोन प्राचीन लिपींचे पुरावे सापडले आहेत. ‘खरोष्ठी’ आणि ‘ब्राम्ही’ या दोन लिपी उत्खननात आढळल्याऊर्दूप्रमाणे उलटे लिहले जाणाऱ्या ‘खरोष्ठी’ लिपीतील लेख कंदहारअफगाणिस्तानतक्षशिलामान्सेरालडाखतुर्कस्थान अशा ठिकाणी सापडले आहेतपरंतुहिंदूकुश पर्वताच्या उत्तरेला या लिपीचा प्रसार झाल्याचे दिसत नाहीब्राम्ही लिपीतील लेख मात्र आजही भारताच्या कानाकोपऱ्यात सापडतातत्यामुळे भारतातील सर्वदूर लोकांना ही लिपी वाचता येत असावीअसा अंदाज आहेजेथे ब्राम्ही लिपी वाचता येत नाहीतेथे खरोष्ठी लिपीचा वापर झाला असावापण खरोष्ठी लिपीचा विकास झाल्याचे आढळत नाही.‘ब्राम्ही’ लिपीचा उत्तरोत्तर विकास झाल्याचे पहावयास मिळते.
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने कोरलेले शिलालेख आणि लेण्यांतील लेखांतून ‘ब्राम्ही’ आजही वाचता येऊ शकतेसम्राट अशोकपासून ते ग्रुप्ता कालखंडापर्यंत  ‘ब्राम्ही’ वापरात असल्याचे पुरावे सापडतातपाल साम्राज्य अर्थात इसवी सन सातव्या ते बाराव्या शतकापर्यंत ‘ब्राम्ही’ लिपी लिहली-कोरली जायची आणि त्यावेळच्या लोकांना ती वाचताही यायचीअर्थात सम्राट अशोकाच्या काळातील ‘ब्राम्ही’ आणि सातव्या-आठव्या शतकातील ‘ब्राम्ही’ यामध्ये अमुलाग्र बदल झालेले होतेपरंतुमूळ ढाचा तोच होतापण बाराव्या शतकानंतर ही लिपी लोप पावलीइतका प्रदीर्घ इतिहास असतानाही त्यानंतर ‘ब्राम्ही’ कोणालाही वाचता येत नव्हतीहे भारताचे दुर्देवच म्हणवे. ब्रिटीश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांच्या सात वर्षांच्या निरंतर परिश्रमानंतर ही लिपी पुन्हा प्रकाशात आलीया लिपीचे वाचन करण्यात त्यांना यश मिळालेत्यामुळे भारताचा प्राचीन इतिहास मुख्यत्वे बौद्धकालीन इतिहास जगासमोर आलाजेम्स प्रिन्सेपपूर्वीही या लिपीचे वाचन करण्याचा प्रयत्न झाला होतामात्र तो यशस्वी झाला नाहीसोळाव्या शतकात दिल्लीचा बादशाह फिरोजशहा तुघलक यांनी मोठ्या परिश्रमाने ब्राम्ही शिलालेख असलेले स्तंभ पंबाजमधील टोपडा आणि मीरठ येथून दिल्लीला आणलेअनेक पंडितांनी हे शिलालेख वाचण्याचा प्रयत्न केलामात्र त्यांना त्यात यश आले नाही.  १८३७ च्या दरम्यान जेम्स प्रिन्सेप यांना हे लेख वाचण्यात यश आलेसर्वप्रथम ‘’ आणि ‘’ हे अक्षर त्यांनी ओळखलेत्यानंतर विस्कटलेली ‘अट्ठकडी’ उमजलीआज जेव्हा देवनागरी तसेच दक्षिण भारतातील लिपींच्या उगमस्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता उत्तर ‘ब्राम्ही’ हेच मिळते.
ब्राम्ही लिपीचा इतर लिपींवर प्रभाव कसाहे समजायचे असेल तर त्यासाठी तुलनात्मक अभ्यास होणे गरजेचे आहे. ‘ब्राम्हीमध्ये ‘’ हा गणितातील ‘लंबचे चिन्ह किंवा इंग्रजीतील उलटा ‘टी’ प्रमाणे लिहला जातोदेवनागरीमध्ये ‘’ असा आहेआता या दोघांमध्ये तुलना केली असता दिसून येते कीउलट्या ‘टीमधील खालची दांडी मध्यभागी सरकल्यानंतर ‘देवनागरी’ लिपीतील ‘’ अक्षर तयार झालेअर्थात हा बदल क्षणात नव्हता झालेला नव्हताकित्येक वर्षांच्या स्थितांतरांनंतर ‘ब्राम्हीतून आजची ‘देवनागरी’ लिपी अस्तित्वात आली. ‘ब्राम्हीमधील एक असेही अक्षर आहे जे जसेच्या तसे राहिलेते म्हणजे ‘’. ‘ब्राम्हीच्या ‘मध्ये काहीच बदल  झाल्यामुळे आजही ज्याच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाहीत्यांना ‘’ म्हणून उपहासात्मक डिवचले जाते. ‘देवनागरीतील ‘’ उलटा लिहल्यास तो ‘ब्राम्हीचा ‘’ होईलअशी अनेक दाखले देता येतील.
प्रत्येक काळखंडातील ब्राम्हीमध्ये बदल होत गेल्याचे उत्खनानातून सापडलेल्या शिलास्तंभलेण्यांमधील कोरीव लेखनाण्यांवरील लेख यावरून स्पष्ट होतेउत्तरेत जशी ‘देवनागरी’ विकसित झालीतसेच पाचव्या शतकात दक्षिण भारतात ‘ब्राम्हीतून ‘ग्रंथा’, ‘कडम्बा’ या दोन लिपी विकसित पावल्यानंतर ‘ग्रंथामूधन ‘तामिळ, ‘मळ्यालम’ तर दहाव्या शतकातील ‘जुन्या कडम्बामधून ‘कनडा’ आणि ‘तेलगू’ लिपी अस्तित्वात आल्याया लिपी हजार वर्षांपूर्वीच्या असून आजही वापरात आहेत. ‘ब्राम्हीतील ‘’ हा चौकोन आकाराने दर्शवला जातोतर चौकानातील वरच्या बाजुची रेघ मिटवली की तो बनतो ‘तामिळमधील ‘’. हे जे बदल होत गेले ते तत्कालीन काळखंड आणि राज्यांच्या प्रभावाचा परिणाम आहे.
चौथ्या ते पाचव्या शतकात गुप्त काळखंडात ‘ब्राम्ही’ वळणदार होती.  आठवे शतक येईपर्यंत झाडाच्या सालीवर लिहण्याची कला अवगत झाली होतीत्यामुळे अक्षरावर रेघ आणि सुटसुटीत  निटनिटकेपणा तेव्हापासून रूढ झालाब्राम्हीमधूनच निर्माण झालेल्या ‘शारदा’ लिपीतून हे दिसून येतेतत्कालीन वेळी काश्मीरी खोऱ्यात या लिपीचा सर्रास वापर व्हायचाशारदाप्रमाणे समांतर इतर लिपीही विकसित होत होत्यात्यापैकी एक ‘नागरी’ लिपी होयताम्प्रपत्रावर लिहल्या जाणाऱ्या आठव्या शतकातील ‘नागरीतूनच नंतर अनेक लिपींनी जन्म घेतला. ‘नंदी नागरी’, ‘लेट नागरी’, ‘आसामी’, ‘बंगाली’, ‘ओरीसा’, ‘गुजराती’, ‘गुरूमुखी’ या सर्व लिपी अकराव्या ते सोळाव्या शतकाच्या काळखंडात उदयास आल्याया ‘नागरीतूनच आपल्या ‘देवनागरीने जन्म घेतला आणि या सर्व लिपींचे उगमस्थान म्हणजे ‘ब्राम्ही होयआज भारताची प्राचीन लिपी म्हणून ब्राम्हीला मान्यता आहेपण त्यापूर्वीही लिखान होतेहे हडप्पा-मोहेन्जदाडो संस्कृतीत मिळालेल्या अवशेषांतून दिसून येतेपरंतुतेव्हा मिळालेले इन्स्क्रीप्शन अद्याप कोणालाही वाचता आलेले नाहीतपण संशोधन सुरू आहेउत्खननाद्वारे मातीत दबून राहिलेले  पुरावे बाहेर निघतील आणि तत्कालीन लिपीमधून लिहलेल्या लेखांद्वारे आणखी नवी संस्कृती प्रकाशात येईल.