लोकसंगीत आणि लोकनाट्य यांची निर्मितीच मुळी समाजप्रबोधनासाठी झाली होती. हेच आजचे कला सादर करणारे विसरले आहेत. कलेला फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून समोर मांडले जात आहे. ‘मांझी-द माऊटंन मॅन’ सारख्ये चित्रपट याला अपवाद आहेत. मात्र १०० पैकी ८० टक्के नाट्य आणि चित्रपट क्षेत्र हे व्यावसायिक झाले आहे. निखळ मनोरंजन करणारे झाले आहे. त्यामुळे समाजाला दिशा मिळेल असे पोवाडे आज गायले जात नाहीत. तेच रहाट गाडगे पुढे सरकत आहे. मग ते टेलिव्हीजन असो वा चित्रपट सृष्टी, सर्वत्र तेच पहावयास मिळत आहे.
संगीत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. पण आपल्या सांस्कृतिक ठेव्यातून हाच आत्मा बदलत चालल्याचे दिसत आहे. काळानुसार कलाक्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आणि कलाकारांमध्येही झाला; तो होणेही अपेक्षित होते. मात्र कलाकारांनी केलेला बदल मुळ गाभ्याला हात न लावता केला असतो तर जास्त सोईस्कर झाले असते. भारतात राजेशाही पध्दत होती, तेव्हापासून कलेची जोपासना होत आली आहे. फरक एवढाच की, तेव्हा कला फक्त संस्थानांच्या राजाच्या मनोरंजनासाठीच होती. प्रजेला दुःखाच्या खाईत लोटून स्वतः राजे मात्र भोगविलासात गुंतलेले असायचे. काही राजे याला अपवाद आहेत. सम्राट अशोकापासून ते राजा शिवछत्रपतींपर्यंत असे काही राजे होऊन गेले की त्यांनी प्रजेच्या हितासाठी निर्णय घेतले. मात्र ‘देवांनाप्रिय’, ‘प्रजापालक’ अशी उपमा ज्यांना दिली जाईल, असे राजे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच होऊन गेले. जलाल अकबर जरी परकिय राजा होता, तरी त्यांनीही जनहितीचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, असे इतिहासावरुन दिसते. बाकीचे मात्र भोगविलासात व्यस्थ असायचे. त्यांच्यासाठीच काय ती कला! नृत्यू, गायन आणि संगीत अशा माध्यमातून ही राजेमंडळी स्वतःचे मनोरंजन करीत असत. मात्र परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. या नियमाप्रमाणे कलाच्या पध्दतीत बदल झाला. काळ बदलला तसे कलेचे क्षेत्रही बदलले. जनतेच्या हितासाठी, जनजागृतीसाठी कला सादर होऊ लागली. शहिरांच्या माध्यमातून जनप्रबोधन होऊ लागले. शौर्याच्या गाथा शाहिरीच्या माध्यामतून रंगु लागल्या. रणांगणात तळपणारी तलवार अन् ढाल, डफावर पडणारा हात आणि डोळयासमोर उभा राहणारा शाहिर हे समीकरण एकरुप झाले. तर कीर्तन-अभंगातून आध्यात्मिक उर्जा मिळू लागली. जी कला फक्त राजे महाराजांच्या मनोरंजनाचे साधन होते, ती आता जनसामान्यात रुजू लागली.
आज समाज प्रबोधन म्हटले की, भला मोठा मंच, संबंधित विषयात पारंगत वक्ते आणि त्यांचे भलेमोठे भाषण असे काहीसे चित्र डोळयासमोर उभे राहते. मात्र याच्या माध्यमातून कितीजणांचे प्रबोधन होते? हा संशोधानाचा मुद्दा आहे. मुळात एखादी गोष्ट जोपर्यंत मनाला भिडत नाही, बोध होत नाही आणि एखादा विचार मनाला भिडवणारी कला कलाकारांकडे अवगत असते. कलेच्या माध्यमातून तत्कालीन संत-महात्म्यांची लोकजागृती केल्याची अनेक दाखले आहेत. संत तुकाराम, संत कबीर, संत चोखोबो, संत गोरा कुंभार, संत रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर आदी संत मंडळींनी कलेच्या माध्यमातून लोकजागृती केली. एवढेच काय तर खुद्द गौतम बुध्दांनी देखील आपले उपदेश ‘गद्या’मध्ये न सांगता ‘पद्या’मध्ये सांगितले आहेत. अर्थात काव्य रुपात सांगितले आहेत. आजही गद्य पेक्षा पद्य जास्त लक्षात राहतात. शाळेकरी मुलांना याचा चांगलाच अनुभव आहे. शाळेमध्ये शिकविले जणारे धडे यापेक्षा कविता जास्त प्रमाणात रोचक वाटतात. किंबहूना कविता या थेट मनाला भिडतात. यामुळे विद्यार्थी धड्यापेक्षा कविता वाचनात जास्त रस दाखवितात. त्याच अनुषंगाने संत महात्म्यांनी लोकांची मानसिकता ओळखून गद्यामध्ये प्रवचन देण्याचे टाळले अन् पद्याच्या माध्यमातून आपली कीर्तने केली. आजच्या मानाने तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते. त्यामुळे संबंधित क्षेत्रापुरतेच मर्यादित रहावे लागत असे. परिणामी मनोरंजनाच्या गोष्ठीही फारशा नव्हत्या. त्यामुळे कष्टकरी दिवसभर राबून सायंकाळी मंदिरात कीर्तन-भजनाच्या माध्यमातून मनःशांतीसाठी तल्लीन होत असे. तोच प्रकार शाहिरीचा झाला. शिवाजी महाराजांची कीर्ती गावोगावी पोवाड्याच्या माध्यमातून गायली जाऊ लागली. किंबहूना पोवाडे गायले गेल्यामुळे अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या सोबतीला आले, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. शिवरायांची कीर्ती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात शाहिरांचा मोलाचा वाटा होता. शाहिराच्या शाहिरीमध्ये एवढी ताकद असते की, कोणीही अन्यायाविरोधात रणांगणावर पेटून उटेल. एवढे वजन पोवाड्यात असते. मात्र आज तसेच होताना दिसत नाही. पोवाडा हा जनहितासाठी गायला जातो. काळाची गरज ओळखून त्यामध्ये बदल घडवावे लागतात. आज पोवाडे गायले जातात ते फक्त शिवरायांच्या गोडव्याचे, मराठीच्या अभिमानाचे. पण समाजाला दिशा देता येईल, असे पोवाडे फारच कमी ऐकावयास मिळतात. लोकसंगीत, लोकनाट्य याची निर्मितीच मुळी समाजप्रबोधानासाठी झाली होती. हेच आजचे कला सादर करणारे विसरले आहेत. कलेला फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून समोर मांडले जाते. नाविण्य नावाची गोष्टच राहिली नाही. दहशतवादावरील चित्रपटांची चलती आहे, म्हणून हॉलिडे, बेबीपासून ते उद्या प्रदर्शित होणार्या फॅन्टममध्ये तेच विषय येत आहेत. मध्यतरी सलमानचा दबंग हा ऍक्शन मसाला चित्रपट फार गाजला होता. या दरम्यानचे चित्रपट पाहिले तर त्याच पठडीतील होते. एवढेच काय तर एखादा कॉमेडी चित्रपट चालला तर धडाधड कॉमेडी चित्रपट निघतात. म्हणजे एकाने करायचे, आणि दुसर्याने गिरवायचे अशी सध्या आपल्या बॉलीवूडने पध्दत अवलंबवली आहे. मल्टील्पेक्सच्या युगात नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी तर अक्षरशः पाठच फिरवली आहे आणि आजचा शाहिर देखील दर्जेदार कला सादर करण्यात कमी पडत आहे. दर्जेदार कला सादर करण्यापेक्षा भव्य-दिव्य रंगमंच उभा करण्यात अधिक रस आहे. हेच गायन क्षेत्रातही दिसत आहे. पूर्वीप्रमाणे नैसर्गिक आवाजापेक्षा सॉफ्टवेअरचाच आवाज प्लेबॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत आहे. पहाडी आवाजात गाणारे शाहिर देखील या सॉफ्टवेअरचा वापर करताना दिसतात आणि प्रेक्षक यालाच दाद देतात. संगीत काळी ५ चे असेल, तर गायकाने काळी चार मध्ये गायले तरी चालते. बाकीची कामे हा संगीत दिग्दर्शक करतो. त्यामुळे आजचे संगीतकार देखील जास्त मेहनत घेण्याची टाळाटाळ करतात आणि या सर्वांमध्ये प्रबोधन म्हणजे काय असते बुवा! अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. अभिनयापासून ते नृत्यू, गायन क्षेत्रातील कलाकारांनी नकली मुखवटे घातले आहेत. मुळ कला कुठेतरी हरवत चालली आहे.
संगीत हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. पण आपल्या सांस्कृतिक ठेव्यातून हाच आत्मा बदलत चालल्याचे दिसत आहे. काळानुसार कलाक्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आणि कलाकारांमध्येही झाला; तो होणेही अपेक्षित होते. मात्र कलाकारांनी केलेला बदल मुळ गाभ्याला हात न लावता केला असतो तर जास्त सोईस्कर झाले असते. भारतात राजेशाही पध्दत होती, तेव्हापासून कलेची जोपासना होत आली आहे. फरक एवढाच की, तेव्हा कला फक्त संस्थानांच्या राजाच्या मनोरंजनासाठीच होती. प्रजेला दुःखाच्या खाईत लोटून स्वतः राजे मात्र भोगविलासात गुंतलेले असायचे. काही राजे याला अपवाद आहेत. सम्राट अशोकापासून ते राजा शिवछत्रपतींपर्यंत असे काही राजे होऊन गेले की त्यांनी प्रजेच्या हितासाठी निर्णय घेतले. मात्र ‘देवांनाप्रिय’, ‘प्रजापालक’ अशी उपमा ज्यांना दिली जाईल, असे राजे हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकेच होऊन गेले. जलाल अकबर जरी परकिय राजा होता, तरी त्यांनीही जनहितीचे अनेक निर्णय घेतलेले आहेत, असे इतिहासावरुन दिसते. बाकीचे मात्र भोगविलासात व्यस्थ असायचे. त्यांच्यासाठीच काय ती कला! नृत्यू, गायन आणि संगीत अशा माध्यमातून ही राजेमंडळी स्वतःचे मनोरंजन करीत असत. मात्र परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. या नियमाप्रमाणे कलाच्या पध्दतीत बदल झाला. काळ बदलला तसे कलेचे क्षेत्रही बदलले. जनतेच्या हितासाठी, जनजागृतीसाठी कला सादर होऊ लागली. शहिरांच्या माध्यमातून जनप्रबोधन होऊ लागले. शौर्याच्या गाथा शाहिरीच्या माध्यामतून रंगु लागल्या. रणांगणात तळपणारी तलवार अन् ढाल, डफावर पडणारा हात आणि डोळयासमोर उभा राहणारा शाहिर हे समीकरण एकरुप झाले. तर कीर्तन-अभंगातून आध्यात्मिक उर्जा मिळू लागली. जी कला फक्त राजे महाराजांच्या मनोरंजनाचे साधन होते, ती आता जनसामान्यात रुजू लागली.
आज समाज प्रबोधन म्हटले की, भला मोठा मंच, संबंधित विषयात पारंगत वक्ते आणि त्यांचे भलेमोठे भाषण असे काहीसे चित्र डोळयासमोर उभे राहते. मात्र याच्या माध्यमातून कितीजणांचे प्रबोधन होते? हा संशोधानाचा मुद्दा आहे. मुळात एखादी गोष्ट जोपर्यंत मनाला भिडत नाही, बोध होत नाही आणि एखादा विचार मनाला भिडवणारी कला कलाकारांकडे अवगत असते. कलेच्या माध्यमातून तत्कालीन संत-महात्म्यांची लोकजागृती केल्याची अनेक दाखले आहेत. संत तुकाराम, संत कबीर, संत चोखोबो, संत गोरा कुंभार, संत रामदास स्वामी, संत ज्ञानेश्वर आदी संत मंडळींनी कलेच्या माध्यमातून लोकजागृती केली. एवढेच काय तर खुद्द गौतम बुध्दांनी देखील आपले उपदेश ‘गद्या’मध्ये न सांगता ‘पद्या’मध्ये सांगितले आहेत. अर्थात काव्य रुपात सांगितले आहेत. आजही गद्य पेक्षा पद्य जास्त लक्षात राहतात. शाळेकरी मुलांना याचा चांगलाच अनुभव आहे. शाळेमध्ये शिकविले जणारे धडे यापेक्षा कविता जास्त प्रमाणात रोचक वाटतात. किंबहूना कविता या थेट मनाला भिडतात. यामुळे विद्यार्थी धड्यापेक्षा कविता वाचनात जास्त रस दाखवितात. त्याच अनुषंगाने संत महात्म्यांनी लोकांची मानसिकता ओळखून गद्यामध्ये प्रवचन देण्याचे टाळले अन् पद्याच्या माध्यमातून आपली कीर्तने केली. आजच्या मानाने तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते. त्यामुळे संबंधित क्षेत्रापुरतेच मर्यादित रहावे लागत असे. परिणामी मनोरंजनाच्या गोष्ठीही फारशा नव्हत्या. त्यामुळे कष्टकरी दिवसभर राबून सायंकाळी मंदिरात कीर्तन-भजनाच्या माध्यमातून मनःशांतीसाठी तल्लीन होत असे. तोच प्रकार शाहिरीचा झाला. शिवाजी महाराजांची कीर्ती गावोगावी पोवाड्याच्या माध्यमातून गायली जाऊ लागली. किंबहूना पोवाडे गायले गेल्यामुळे अनेक मावळे शिवाजी महाराजांच्या सोबतीला आले, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. शिवरायांची कीर्ती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यात शाहिरांचा मोलाचा वाटा होता. शाहिराच्या शाहिरीमध्ये एवढी ताकद असते की, कोणीही अन्यायाविरोधात रणांगणावर पेटून उटेल. एवढे वजन पोवाड्यात असते. मात्र आज तसेच होताना दिसत नाही. पोवाडा हा जनहितासाठी गायला जातो. काळाची गरज ओळखून त्यामध्ये बदल घडवावे लागतात. आज पोवाडे गायले जातात ते फक्त शिवरायांच्या गोडव्याचे, मराठीच्या अभिमानाचे. पण समाजाला दिशा देता येईल, असे पोवाडे फारच कमी ऐकावयास मिळतात. लोकसंगीत, लोकनाट्य याची निर्मितीच मुळी समाजप्रबोधानासाठी झाली होती. हेच आजचे कला सादर करणारे विसरले आहेत. कलेला फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून समोर मांडले जाते. नाविण्य नावाची गोष्टच राहिली नाही. दहशतवादावरील चित्रपटांची चलती आहे, म्हणून हॉलिडे, बेबीपासून ते उद्या प्रदर्शित होणार्या फॅन्टममध्ये तेच विषय येत आहेत. मध्यतरी सलमानचा दबंग हा ऍक्शन मसाला चित्रपट फार गाजला होता. या दरम्यानचे चित्रपट पाहिले तर त्याच पठडीतील होते. एवढेच काय तर एखादा कॉमेडी चित्रपट चालला तर धडाधड कॉमेडी चित्रपट निघतात. म्हणजे एकाने करायचे, आणि दुसर्याने गिरवायचे अशी सध्या आपल्या बॉलीवूडने पध्दत अवलंबवली आहे. मल्टील्पेक्सच्या युगात नाट्यगृहाकडे प्रेक्षकांनी तर अक्षरशः पाठच फिरवली आहे आणि आजचा शाहिर देखील दर्जेदार कला सादर करण्यात कमी पडत आहे. दर्जेदार कला सादर करण्यापेक्षा भव्य-दिव्य रंगमंच उभा करण्यात अधिक रस आहे. हेच गायन क्षेत्रातही दिसत आहे. पूर्वीप्रमाणे नैसर्गिक आवाजापेक्षा सॉफ्टवेअरचाच आवाज प्लेबॅकच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळत आहे. पहाडी आवाजात गाणारे शाहिर देखील या सॉफ्टवेअरचा वापर करताना दिसतात आणि प्रेक्षक यालाच दाद देतात. संगीत काळी ५ चे असेल, तर गायकाने काळी चार मध्ये गायले तरी चालते. बाकीची कामे हा संगीत दिग्दर्शक करतो. त्यामुळे आजचे संगीतकार देखील जास्त मेहनत घेण्याची टाळाटाळ करतात आणि या सर्वांमध्ये प्रबोधन म्हणजे काय असते बुवा! अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. अभिनयापासून ते नृत्यू, गायन क्षेत्रातील कलाकारांनी नकली मुखवटे घातले आहेत. मुळ कला कुठेतरी हरवत चालली आहे.