Monday, 21 December 2015

अमानुष अत्याचाराचा वचपा!

मानवाच्या उत्क्रांतीनंतर स्थलांतर हा त्याच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा राहिला आहे आणि भारत हा मानवी वस्ती वाढीसाठी पोषक भुखंड असल्यामुळे भारतात स्थालांतरासाठी अनेकांनी अनुकुलता दर्शवली. साधारण पाच हजार वर्षांपूर्वी युरेशियन येथील रानटी टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले. रानटी युरेशियन टोळ्या आणि येथील स्थानिक नागवंशी यांच्यात संघर्ष झाला आणि जो शेवटपर्यंत या युरेशियन लोकांचा विरोध करत होता, त्यांना या उर्मट लोकांनी शुद्र म्हणून हिनवून अस्पृश्यतेची वागणूक दिली. या अस्पृश्यतेचा उद्रेक झाल्यानंतर जन्म झाला एक अशा इतिहासाचा जो येथील तथाकथित इतिहासकारांनी नेहमीच अंधारात ठेवला.
भारताचा इतिहास हा तथाकथीत उच्च वर्णिय आणि अस्पश्य यांच्यामधील संघर्ष असून दुसरे काही नाही. पण हा संघर्ष कधीच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात उतरला नाही. जातीव्यवस्था ही भारताच्या विकासाला लागलेली मोठी किड आहे. गौतम बुध्द म्हणतात, दुःख संपवायचे असेल तर त्या दुःख उत्पन्न होणार्‍या कारणाच्या मुळाशी गेले पाहिजे. पण भारतात जातीव्यवस्था कशी फोफावली, याचा नेमका इतिहास सापडत नाही. किंबहुना कर्मदरिद्ˆय लोकांनी हा इतिहास लिहून ठेवण्याची मेहनत घेतली नाही. सहाजिकच हे काम तत्कालीन वेळी ज्यांना लिहण्या-वाचण्याचा हक्क होता, त्यांचे होते. पण आपले बिंग फुटेल, या भितीने यांनी इतिहास दडविण्याची खबरदारी नेमकी घेतली. सम्राट अशोकाचा नातू ब्रहदत्त यांच्या हत्येनंतर भारतात जातीवादाने आपली मुळे घट्ट रोवली. बौध्द धम्माचा र्‍हास करण्यासाठी भिक्खुंचे मुंडके कापणार्‍यास पारितोषिके देण्यात येत असत. शुद्रांकडून शिक्षणाचा हक्क काढून घेतला. त्यांना गावाच्या वेशीबाहेर हकलण्यात आले. गुलामीचे जिने जगण्यास भाग पाडले आणि हजारो वर्षांच्या गुलामीचा उद्रेक पेशवाईच्या शेवटाने झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महारा-मागांना मानाचा दर्जा मिळाला होता. महाराजांच्या मावळ्यांमध्ये धनगर, माग, महार, चांभार आदींचा जास्त भरणा होता. त्यात महाराजांकडे निष्ठावंत मुस्लीमही होते. त्यामुळे कोणी राजेंच्या नावावर हिंदुत्वाचा पुरस्कार करत असतील, तर त्यांनी इतिहासातून थोडे धडे घेतले पाहिजेत.
शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रावर अधिराज्य गाजविण्यासाठी पोर्तुगिज, ब्रिटीश तडफडत होते; पण राजांच्या दुरदृष्टीमुळे त्यांना ते शक्य नव्हते. त्यांच्या मार्गातला मुख्य अडथळा महार होते. दरम्यान, महाराजांच्या संशयास्पद मृत्यूनंतर (हत्या) महाराष्ट्रात पेशवाईचा जन्म झाला. या पेशवाईला बळ देण्याचे कामही महारांनीच केलेे. प्राचीन काळी महारांना महा+अरी संबोधले जायचे. अरी म्हणजे शत्रू, शत्रुंचा संहार करण्यात तरबेज अशी महाअरी जमात होती. पण नंतर त्याचे अपभ्रश होऊन महार झाले. मुगल आणि ब्रिटीशांच्या फौजेला सीमेवर रोखण्याचे अतुलनीय कार्य महार पार पाडत होते. त्यामुळे तर पेशवाई अबाधित राहिली होती. खर्ड्याच्या लढ्यात सिदनाकच्या नेतृत्वाखाली महार सैनिकांनी पेशव्यांना विजय मिळवून दिला होता. पण या विजयानंतर माधवराव पेशव्याचा उन्मात इतका वाढला की त्याने रणांगनावरच महारांचा अपमान केला. जेव्हा आपले बस्तान बसले, तेव्हा शिंपल्यातील मोती काढून शिंपल्याला केराची टोपली दाखवावी, असे माधवराव पेशव्याने महारांना वेगळे केले. फक्त वेगळेच केल नाही महारांवर अमानुष अत्याचारही केला. मानुसकीला काळीमा; अशी क्रुर वागणूक दिली. पेशवाईने महारांवर किती अत्याचार केले आहेत, याची गणना केली तर संख्या कमी पडायची. पाच हजार वर्षांच्या काळात इतकी क्रुर वागणुक कोणी दिली नव्हती, तेवढी पेशवाईच्या काळात महारांना सहन करावी लागली.  हे पेशवे इतके निष्ठुर आणि क्रुर होते की, ते महारांच्या शिराचा बॉल करुन तलवारीला हॉकीची स्टीक समजून खेळत असत. शनिवारवाड्यात हा खेळ रंजकपणे पाहिलाही जात असे.  गळ्यात मडके, पाठीला झाडू, कंबरेला घंटी, हाता-पायात काळा दोरा ही महारांची ओळख. दुपारी १२ ते ३ या वेळेतच सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा; अन्यथा कोणावर या महारांची सावली पडले, तर अनर्थ होई.  त्यांना गावाबाहेर गुरे-ढोरे ओढण्याची, संदेश वाहकाची कामे दिली जात. उष्ट्यांवर पोट भरावे, हा दंडकच!  आणि या अमानुष अत्याचाराचा बदला ‘त्या’ ५०० शुरवीर महारांनी घेतला. तो म्हणजे पेशवाई संपवून. सुमारे २५ हजार पेशवा सैनिकांना केवळ ५०० महार सैनिकांनी चारिमुंड्या चित केले.
(क्रमश)

No comments:

Post a Comment