Monday, 13 June 2016

... व्यर्था सास ना खोय

भारताला सांस्कृतिक चळवळीचा मोठा वारसा लाभला आहे. संत मंडळीही याच सांस्कृतिक चळवळीचा एक दुवा आहेत. किंबहुना त्यांनी सांस्कृतिक चळवळीला दिशा दिली. कोणताही समाज घडत असताना प्रबोधन म्हणून ‘गद्य’ एेवजी ‘पद्य’चा मोठा प्रभाव पडतो. त्यामुळेच की काय, संत परंपरेतील मंडळींचे वाङमय काव्य स्वरुपात आहे. त्यापैकीच एक संत कबीर. यांनी आपले उपदेश दोहांतून सांगितले. संत तुकारामांनी जसे भंग न पावणाऱ्या ‘अभंगा’तून तत्कालीन समाजव्यवस्थेवर आसुड ओढले. तसे कबीरांनी ‘दोहां’तून अज्ञानाच्या चिखलात रुतलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी आपले जीवन खर्ची पाडले.
‘पोथ्ाी पढपढ जग मुआ’ या दोहात त्यांनी नसत्या उठाठेव करणाऱ्यांवर टीका केली. संत कबीरांचा जन्म १५ व्या शतकातला. वास्तविक पाहता त्यांची खरी जन्मतारीख कोणती, यावरुन इतिकास अभ्यासकांमध्ये मतभेत आहेत. काहींच्या मते त्यांचा जन्म २० मे १३९९ रोजी झाला. काहींच्या मते १४४० ते १५१८ या काळात कबीरांचा जन्म. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयाने १४ जून ही तारीख कबीर जयंती म्हणून पकडली. तर दिल्लीत २० जून रोजी कबीर जयंतीचा महासोहळाही आयोजित करण्यात आला आहे. असो, एकंदर १५ व्या शतकातील समाजव्यवस्था वर्णाश्रमावर आधारीत होती. विशिष्ट वर्गाला विशिष्ट काम होते. दर्जा होता. त्यामुळे वेद-पुराण-शास्त्रांचा अफाट (?) अभ्यास असणाऱ्यांना ‘पंडित’ म्हणून संबोधले जायचे. मग त्याचे शीलाचरण शून्य असले तरी काहीही हरकत नाही. अर्थात नुसतेच वाचून चालत नाही तर ती शिकवण अंगीकारावी लागते, ही बाब १५ व्या शतकात लुप्त झाली होती. शीलाचरण म्हणजे काय? हेच माहित नव्हते. अशा समाजाला सम्यक मार्गाची शिकवण देणे ही कबीरांसामोर मोठे आव्हान होते. एकतर सूर लागत नाही, त्यात चुकीचा ‘सा’ म्हटल्यावर गाणे बेसुरच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ; मात्र ‘सरगम’च माहिती नसणाऱ्यांना ती कशी शिकवायची हा पेच कबीरांसामोर होता. पण त्यातून त्यांनी मध्यम मार्ग काढत जे चुकीचे आहे ते पटवून देऊन योग्य काय याची ओळख करून िदली. एकंदर समाजव्यवस्थेची घडी मोडण्याचे काम कबीरांनी केले. हा तत्कालीन समाजव्यवस्थेवर मोठा आघात होता. संत मंडळींना बंडखोर म्हणतात, हे त्यामुळेच कदाचित. प्रेम अर्थात्ा मैत्री करण्याची शिकवण त्यांनी दिली. पण मैत्री कधी केली जाऊ शकते? जेव्हा आचरण शुध्द असेल तेव्हा. मैत्री विकस्िात झाल्यानंतर करुणा, मुदिता, उपेक्षा भाव जागृत होतात आिण हे प्रत्यक्षात कसे करायचे? याचेही उत्तर त्यांनी दिले. प्रेम शिकण्यासाठी श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा उपदेश दिला. आपल्या शरीरावर प्रकट होणाऱ्या वेदना-संवेदनांना द्वेष-आसक्ती विरहीत भावनेने पाहण्यासाठी त्यांनी श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा मार्ग सांिगतला. असे केल्यानेच ‘ढाई आखर प्रेम’ आस्मसात करता येईल. पण प्रेमाची बोली बोलण्यापेक्षा आपल्याकडे व्यर्थ बडबड करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यात वाळूच्या कणांच्या संख्येएवढे निरर्थक वाद करणारे भेटतील. त्यामुळे कबीरांवर ‘ना काहू से दोस्ती, ना काहू से बैर’ म्हणण्याची वेळी आली होती. अर्थात ही देखील एक शिकवणच आहे. संत मंडळींची कोणतीही वाणी फुकटची नसते. त्यामध्ये गुढ अर्थ दडलेला असतो. शतक १५ वे असो किंवा काळ आत्ताचा असो, माणसांची प्रवृत्ती सारखीच राहते. पण कर्म तसे फळ या नैसर्गिक नियमानुसार बाभळीचे झाड लावल्यानंतर काटेच येणार, हे निश्चित, आिण या जगात कुकर्म करणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्यामुळे कोणाशी जवळीकही नको आिण शत्रुत्वही नको. अर्थात आसक्ती आणि द्वेष नको, असे त्यांना सांगायचे होते. भवचक्रात अडकण्याचे हे दोन कारण आहेत. आसक्ती आिण द्वेष करणारे कधीही सुखी राहू शकत नाही आिण दुसऱ्यांनाही आंनदी जीवन जगू देत नाहीत. याचीच चिंता कबीरांनाही सतावत होती. १५ व्या शतकात ‘मोक्षमुक्ती’चा बोलबाला होता. आजही आध्यात्मिकतेची सांगड घालणाऱ्यांचे तेच ध्येय आहे. पण ही मुक्ती साधण्याच्या मार्गावर काटे पसरल्यामुळे तो मार्ग अस्पष्ट झाला आहे. त्यामुळेच कबीर म्हणतात, ‘चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच मे बाकी बचा ना कोय’. ही कबीरांची वाणी असल्यामुळे थोडी समजण्यात जड जाते. आध्यात्मिक भाषेत सांगायचे झालेच तर जीवन-मरणाचे भवचक्र आहे, त्यामध्ये प्रत्येकजण भरकटत चालला आहे. याचाच त्रास कबीरांना होत आहे. कारण ते या भवचक्रातून मुक्त झाले आहेत आिण इतराच्या मुक्तीचा मार्गही त्यांनी सांगितला आहे. ‘...ढाई आखर प्रेम’, ‘सास सास पर ध्यान...’, ‘...ना काहू से बैर’, ‘...फल लागे अति दुर’ अशा अनेक दोहांतून त्यांनी शुध्द जीवनाचा उपदेश दिला. तरीही ‘दो पाटन के बीच’ प्रत्येकजण भरडला जात आहे. भविष्य आिण भुतकाळात मन सतत भरकटत असल्यामुळे वर्तमानात जगण्याचा आनंद मिळत नाही. जे स्वत:चा श्वास पहायला शिकतात, त्यांना जीवनाची जाणीव कळते आिण वायफळ वेळ घालवत नाही. कारण, ‘ना जाने इस सास का आवन होय ना होय’ हे ते चांगल्या पध्दतीने ओखळतात. 

No comments:

Post a Comment